पोवाडा - दुसरे बाजीराव पेशवे यांजवर पोवाडा १
अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
ह्या पेशव्यांचा जन्म इ.स. १७७५ चे जानेवारी महिन्यात धार मुक्कामी झाला. ह्यांचे बाळपण आनंदवल्ली व कोपरगाव वगैरे मुक्कामी जाऊन पुढे ते शिवनेरी किल्ल्यात होते. सवाई माधवराव साहेब हे आक्टोबर१७९५ महिन्यात मृत्यू पावल्यावर, नाना फडणीस, परशराम भाऊ, शिंदे, होळकर वगैरेच्या दरम्यान कित्येक राजकारणे होऊन बाजीरावास दिजंबर १७९६ मधे पेशवे पदावर स्थापण्यात आले. यांची बहुतेक कारकीर्द दान धर्म, राजकारणाचे ज्यास काडीभरही ज्ञान नाही अशा लोकांची संगत व सल्ला, स्वारी शिकारीचा पूर्ण अभाव, आणि देशी व परदेशी फौजबंद सरदाराचे द्वेश संपादन, यात गेली. अखेर सन १८१७ चे नवंबर महिन्यात खडकीचे लढाईत इंग्रजांनी पराभव करून ता. १७ रोजी शनवार वाड्यावर आपला बावटा चढविला. आणि बाजीराव याणीं पळ काढला. याप्रमाणे पळण्यात सुमारे सहा महिने लोटल्यावर महू येथे ता. ३ जून १८१८ रोजी पेनशनाचे मोबदला मराठेशाहीचे उदक मालकमसाहेब यांचे हातावर सोडून ब्रह्मवर्तास रवाना झाले, आणि तेथे काळक्रमण करीत असता १८५१ जानेवारी महिन्यात मृत्यू पावले. सदरील हकीकतीचे वर्णन ह्या पोवाड्यात संक्षेपाने केले आहे.
Type: PAGE | Rank: 0.01082276 | Lang: NA